मुंबई महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांची नासधूस, जमिनीची धूप आणि पशुधनाचे नुकसान झाले. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज 6 कोटी 57 लाख 331 रुपये जमा करण्यात आले आहेत.
माहिती अधिकार कार्यकर्ते वैभव कोकट यांनी जनमाहितीच्या अधिकारांतर्गत मागवलेल्या माहितीत मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली आहे. ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांना मदतीचे आवाहन केले होते. सीएम रिलीफ फंडातील या निधीमुळे गरजूंना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यात ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे सुमारे अडीच कोटी शेतकरी बाधित झाले. आमदार, लोकप्रतिनिधी, सरकारी कर्मचारी, पत्रकार यांनी एक दिवसाचा पगार दिला होता. उद्योग, सामाजिक संस्था, साखर कारखानदार आणि समाजातील लोकांनी मुख्यमंत्री मदत निधीसाठी देणगी दिली होती.
वैभव कोकाट यांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये किती पैसे जमा झाले आणि किती वितरित झाले, हे सर्वसामान्यांना कळायला हवे. पारदर्शकता राखण्यासाठी सरकारने स्वतंत्र डॅशबोर्ड तयार करावा.