मुंबई महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील बार्शी-लातूर महामार्गावरील जांभळबेट येथील पुलावर काल रात्री कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. जखमींना बार्शी येथील जगदाळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बार्शी पोलिसांनी ही माहिती दिली. पोलिसांनी सोमवारी सांगितले की, अनिकेत गौतम कांबळे (वय 28, रा. पनवेल) याचे पाच दिवसांपूर्वी मेघना अनिकेत कांबळेसोबत लग्न झाले होते. अनिकेत त्याची नवविवाहित पत्नी मेघना आणि अन्य पाच नातेवाईकांसह रविवारी सायंकाळी सोलापूरमधील तुळजापूर येथे जाण्यासाठी पनवेल येथील आपल्या घरातून निघाला होता. त्यांची कार सोलापुरातील जांभळबेट पुलावर येताच अचानक त्यांची कार समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. या अपघातात कार स्वार गौतम भगवान कांबळे (65), जया गौतम कांबळे (60), सारिका संजय वाघमारे (45), संजय तुकाराम वाघमारे (50) व अन्य एकाचा मृत्यू झाला. तर नवविवाहित जोडपे अनिकेत व मेघना जखमी झाले.